फाल्गुन पौर्णिमेला होळी असे म्हणतात. होळीचा दुसरा दिवस म्हणजेच धुळवड किंवा धुलीवंदन किंवा रंगपंचमी. अनेक गावांमध्ये दोन दिवस, तीन दिवस, पाच दिवस, पंधरा दिवस होळी किंवा धुली वंदन साजरी करण्याची पद्धत आहे. चला पाहू धुलीवंदनाची माहिती.
यात देखील तफावत आढळते. काही काही ठिकाणी चिखल फेकला जातो. धुळवळीची माती एकमेकांच्या अंगावर टाकली जाते. पण बऱ्याच प्रमाणात होळीची राख ही एकमेकांना लावली जाते आणि त्यानंतर स्नान केले जाते. म्हणजेच आपण धुली म्हणजेच धूळ आणि वंदन म्हणजे ती वंदनीय पवित्र अशी राख.
तेव्हा आपण आपल्या अंगाला लावायचं आणि त्यानंतर आपण आंघोळ करायची. अशी त्यामागची भावना असते. कारण पृथ्वी म्हणजेच माती म्हणजेच ही राख किंवा धूळ. तिला पूजन करण्याचे, तिच्यापुढे नतमस्तक होण्याचा, हा एक मार्ग आहे असे म्हटले तरी चालेल.
धुलीवंदनाच्या दिवशी काय केले जाते
- हल्ली या धुलीवंदनाचे स्वरूप बदलत चालले आहे. हल्ली कोणीच होळीची राख अंगाला लावताना दिसत नाही. एकमेकांना लावताना दिसत नाही.
- एवढेच नव्हे तर आधी स्त्रिया पाण्याने भरलेला हंडा होळीच्या राखेवरती सूर्यप्रकाशात ठेवायचे आणि मग त्या पाण्याने घरातील मुलांना आंघोळ घातली जायची. असे करण्याचा एक समज होता की त्यांना उन्हाळा बांधणार नाही. हि गोष्ट देखील कोणी करताना फारसे आढळत नाही. काही गावांमध्ये ही गोष्ट आवर्जून केली जात असेल.
- पण शहरी भागात या सर्व गोष्टी लोप पावताना आपल्याला दिसत आहेत. साधा उल्लेख ही कुणी करत नाही किंवा पाहण्यातही आलेला नाही.
याचे बदललेले स्वरूप म्हणजे एकमेकांना रंग लावणे. एकमेकांच्या अंगावरती रंगीत पाण्याचा फवारा उडवणे. रंगीत फुगे मारणे इत्यादी. हल्लीचे धुलीवंदन किंवा रंगपंचमी म्हणजे एक त्रासदायकच आहे असे म्हटले तरी चालेल. - आपल्या त्वचेला इजा करणारे रंग. तसेच जबरदस्तीने एकमेकांना रंग लावणे. त्यानंतर जबरदस्तीने भांग पाजणे. हे प्रकार हल्लीच्या होळीमध्ये सर्रास पाहायला मिळतात.
पुरातन काळी श्रीकृष्ण व राधा यांनी देखील होळी खेळल्याचे आपल्याला ऐकण्यात आले असेलच. त्यामध्ये त्यांनी फुलांचा, नैसर्गिक रंगांचा उपयोग केलेला. पण हल्ली त्याच्या उलट आपल्याला पाहायला मिळते.
परंतु हळूहळू ही परिस्थिती बदलत चालली आहे. लोक देखील सजग होत आहेत. त्यामुळे नैसर्गिक रंग देखील हल्ली उपलब्ध आहेत. जर ते नसतील तर आपण आपले घरगुती काही उपाय आहेत. जसे की हळद आहे किंवा मुलतानी माती आहे. यांचा वापर करून देखील धुलीवंदन, रंगपंचमी साजरी करू शकतो.
धुलीवंदन / रंगपंचमी साजरे करताना काय काळजी घ्यावी
- लहान मुलांना कोणतेही दागिने वगैरे घालू नये. खेळण्यांमध्ये ते हरवण्याची शक्यता असते.
- दुसरे म्हणजे ओल्या रंगाने होळी खेळू नये. कारण इतर कोणते ओले रंग लावले. तर ते पक्के
- होतात आणि निघण्यामध्ये खूप वेळ लागू शकतो.
- त्यानंतर रंगपंचमी खेळण्याआधी शरीराला तेल लावावे. म्हणजे एखादा रंग जास्त काळ
- टिकणार नाही आणि लवकर निघण्यास मदत होईल.
- तसेच केसांना देखील रंगांपासून वाचवायचे असेल तर शॉवर कॅप किंवा फडका वगैरे तुम्ही बांधू शकता. अगदी नाही तर तुम्ही केसांना देखील तेल लावू शकता. त्याने रंग लवकर निघू शकतो.
तसे हे रंगांची उधळण करणारे धुलीवंदन जर आपण सजगरित्या व सावधतेने साजरे केले तर नक्कीच त्याचा आपण पुरेपूर आनंद लुटू शकतो. यामध्ये कोणालाही इजा होणार नाही याची देखील खात्री बाळगली पाहिजे. त्यात कोणावरती जबरदस्ती करू नये. कोणाच्या मनाविरुद्ध रंग लावू नये. याचे देखील भान ठेवणे आवश्यक आहे. इतरांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा देखील आपण विचार करावा. कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाही. याकडे देखील आपले लक्ष असले पाहिजे. तरच हा सण कुठच्याही संकटाशिवाय निर्विघ्नपणे पार पडू शकतो.