आपल्याकडे लग्न करण्याआधी किंवा लग्न ठरवताना अनेक गोष्टी लक्षात घेतल्या जातात. जसे कि मुलाची आणि मुलीची पत्रिका, उंची ,नोकरी वगैरे. त्यात पत्रिका जुळण्याला अधिक महत्व आहे. कारण त्यात मंगळ दोष आहे किंवा नाही हे देखील पहिले जाते.
तसे असल्यास लग्न न करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच असे हि म्हणतात कि मंगळ दोष असणाऱ्यांचे लग्न मंगळ दोष असणाऱ्यां सोबतच केले जाते. mangal asalelya mulishi lagn ka karat nahit?
मंगळ असलेल्या मुलींशी लग्न करणे का टाळले जाते?
मंगळ दोष म्हणजे काय?
मंगळ दोष म्हणजे जर मंगळ ग्रहाच्या चढत्या घरात ४ थे घर, ७ वे घर, ८ वे घर, १२ वे घर यामध्ये असेल तर त्या जन्म पत्रिकेमध्ये मंगळ दोष असतो असे ज्योतिष शास्त्रात म्हणतात.
वैवाहिक जीवनावर होणारे परिणाम
मंगळ दोष असलेल्यांच्या वैवाहिक जीवनात काय परिणाम होतात ते पाहू
- अशा लोकांचे वैवाहिक संबंध नेहमीच बिघडतात.
- या दोषामुळे जोडप्यामध्ये भांडण होते किंवा दुरावा निर्माण होऊ शकतो.
- मंगळ असलेल्या व्यक्तीस एकटेपणा फार आवडतो.
- त्यात इतर कोणताही ग्रह मंगळाच्या जवळ येतो तेव्हा तो त्याच्याशी लढतो. त्यामुळे लग्न होण्यास उशीर होतो.
- ठरलेलं लग्न मोडू देखील शकतं.
- लग्न लागण्याच्या वेळी अडचणी येतात.
- वैवाहिक जीवन खूपच अडचणींचे असू शकते.
- सतत राग राग करणे हा एक गुणधर्म आहे या व्यक्तींचा.
- त्याचप्रमाणे अशा व्यक्तींना रक्त विकार देखील उद्भवू शकतात.
मंगळ असलेल्या मुलींशी लग्न करणे का टाळले जाते या प्रश्नाचे उत्तर:
पत्रिकेत जर मंगळ दोष आढळला तर वर सांगितल्याप्रमाणे अनेक दुष्परिणाम वैवाहिक जीवनावर होतात. त्यामुळे मंगळ असलेल्या मुलाशी अथवा मुलीशी विवाह टाळण्याचा सल्ला दिला जातो. कारण विषाची परीक्षा कोण घेणार? सर्व काही माहित असूनही स्वतः च्या पायावर दगड मारून घेतल्या सारखे होते.
पण काही प्रेमविवाहा मध्ये असलेली जोडपी अशा दोषांना गृहीतच धरत नाहीत आणि लग्न करतात. त्यात काही यशस्वी होतात. तर काही नाही. मग स्वतः च्या चुकांना विचारात न घेता खापर मंगळ वर फोडतात.
पण मंगळ असलेल्या मुलींशीच नव्हे तर मंगळ असलेल्या मुलाशी देखील लग्न टाळले जाते. कारण तुम्हाला आता कळलेच असेल.
जे मांगलिक आहेत. पण त्यांचा संसार सुखाचा चालू आहे. शेवटी संसार म्हटला कि चढ उतार हे आलेच. या अडचणींच्या काट्यातून मार्ग काढत आपला प्रवास करायचा आहे. हे संसार चक्र चालवायचे आहे. तसेच अडचणी या फक्त लग्न झालेल्यानाच नाही तर सगळ्यांना असतात. जीवनाचा तो नियम आहे. सतत चांगला मार्ग, सरळ वाट कशी असेल? थोडे फार त्रास हे काढायचेच असतात.
मंगळ दोषावर काही उपाय: ज्योतिषशास्त्र काय सांगते
ज्योतिष शास्त्रात काही उपासना किंवा काही उपाय आहेत. त्यामुळे यामध्ये बदल होऊ शकतो. पण हा दोष पूर्णपणे दूर केला जाऊ शकत नाही.
S.No | मंगळ दोषावर उपाय |
---|---|
1 | काही वेळा कुंभ लग्न केले जाते आणि मग त्या व्यक्तीचे दुसरे लग्न लावून दिले जाते. |
2 | मंगळवारी लाल मसूर दान करा. त्यामुळे थोडाफार प्रभाव कमी होऊ शकतो. |
3 | हनुमान चालीसाचे पठण करावे. |
4 | शिव आणि शक्तीची पूजा करणे. |
5 | चांदीच्या वाटीमध्ये मध ठेवावा. स्वतः मध खाऊ नये. |
6 | शंकराला लाल फुले अर्पण करावीत. |