मित्रहो बऱ्याचदा आपण ऐकले असेल की प्रेम हे एकदाच होते. तसेच लग्नसुद्धा एकदाच होते. पण काहींच्या बाबतीत परिस्थिती अशा टप्प्यावर आणून ठेवते की, त्यांना दुसऱ्या लग्नाशिवाय पर्याय नसतो. जसे की, विधवा,त्यांच्या पदरात मुले आहेत आणि काही विदुर देखील अशांना या दुसऱ्या लग्नाची गरज नक्कीच भासू शकते आणि त्यात वावगं असं काही नाही.
हिंदू विवाह कायद्यानुसार जर पहिले कायदेशीर पती किंवा पत्नी जीवंत असतील तर दुसरे लग्न बेकायदेशीर ठरते किंवा रद्द होते. आणि तसे करणाऱ्यास शिक्षा ही होते.त्यामुळे दुसरे लग्न करण्यापूर्वी काय काळजी घेतली पाहिजे हे आपण पाहूया. खाली दिलेल्या परिस्थिवरून लक्षात येईल दुसरे लग्न कधी होऊ शकते:
दुसरे लग्न कधी होऊ शकते
- जर पहिले कायदेशीर पती किंवा पत्नी हयातच नसतील आणि त्याचा पुरावा म्हणजेच त्यांचा मृत्यूचा दाखला जर असेल तर अशा स्थितीमध्ये दुसरे लग्न होणे किंवा करणे हे योग्य आहे. यात कोणतीही अडचण येत नाही.
- पण जर पहिले कायदेशीर पती किंवा पत्नी हयात आहेत जिवंत आहेत आणि तरीदेखील दुसरे लग्न करावयाचे असेल. तर त्यांच्या पासून म्हणजेच पहिल्या कायदेशिर पती किंवा पत्नी पासून कायदेशीर रित्या घटस्पोट घेऊन मगच दुसरे लग्न करता येते. कारण दूसर्या लग्नाच्या वेळी जर घटस्पोट घेतलेली व्यक्ती लग्नं करणार असेल तर त्याचे घटस्फोटाचे कागदपत्र सादर करणे आवश्यक असते. तरच त्याचे दुसरे लग्न कायदेशीर किंवा त्या विवाहाची नोंद होते.
- यात अजून एक परिस्थिती उद्भवते ती म्हणजे पहिले कायदेशीर पती किंवा पत्नी बेपत्ता असतील. म्हणजेच ते हयात आहेत की नाही? याची काहीच शाश्वती नाही. तर अशा स्थितीमध्ये त्या बेपत्ता व्यक्तीची पोलीस तक्रार तसेच ती व्यक्ती बेपत्ता झाल्याची वर्तमानपत्रांमध्ये दिलेली जाहिरात आणि ती बेपत्ता व्यक्ती गेली सात वर्षे बेपत्ता असली पाहिजे.. यावरूनच दुसरे लग्न करू इच्छिणाऱ्या त्या व्यक्तीस एकतर्फी घटस्फोट मिळू शकतो आणि मग ती व्यक्ती दुसरे लग्न करू शकते.
तर या होत्या काही स्थिती ज्यामुळे दुसरे लग्न करताना विशेष काळजी घेतली पाहिजे.
पुनर्विवाह करताना काय काळजी घ्यावी
- जर विधवा स्त्रीचे दुसरे लग्न होणार असेल तर तिच्या सासरच्यांचा पण सपोर्ट असेल तर खूपच छान.
- विधवा स्त्री बरोबर जर मुले असल्यास त्यांची पण जबाबदारी ही तिच्या होणाऱ्या दुसऱ्या नवऱ्याची असते यावर नक्कीच चर्चा व्हावी.
- जर एखादा विधुर लग्न करणार असेल तर त्याच्या सोबत त्याचे घरातील वडीलधारी बोलणीसाठी यावे. एकट्याने येणे चांगले दिसणार नाही.
- जर दुसरे लग्न करू इच्छिणाऱ्या मुलाला जर पहिल्या बायकोकडून मुले असतील तर त्यांचा सांभाळ त्याच्या आता होणाऱ्या दुसऱ्या बायकोने करावा त्याबाबतची चर्चा केली जावी.
- घटस्फोटित व्यक्ती सोबत लग्न करणार असाल तर त्यांचे कागदपत्रे नक्की तपासून पाहा.
- एखादी व्यक्ती हयात नाही म्हणजेच जिवंत नाही तर त्याचा मृत्यूचा दाखला पण तपासून पाहा आणि इतर चौकशी करा.
तर ह्या होत्या काही गोष्टी ज्याची खास काळजी घेतली जावी. आणि अजून काही गोष्टी असतील तर त्यावर व्यवस्थित चर्चा करावी आणि मनातले सर्व संभ्रम दूर करून घ्यावेत म्हणजे पुढे काही त्रास होणार नाही.
दुसऱ्या लग्नाकडे पाहण्याचा दृष्टीकोन
पहिल्या लग्नात ठेच लागली म्हणजे दुसरे लग्न पण सफल होणार नाही ही अडी मनातून आधी काढून टाका. एका नव्या उमेदीने पुन्हा उभे रहा.
जीवनाचा आस्वाद घ्या. सगळ्यांनाच दुसरा पर्याय मिळतो असा नाही. कदाचित यात तुम्हाला न मिळालेले प्रेम मिळेल. त्याचा स्वीकार करा. कोण काय म्हणेल? या कडे जास्त लक्ष देऊ नका. नाहीतर उगाच तुमचे मानसिक खच्चिकरण होईल.
पुन्हा एकदा नवी सुरुवात करा आणि स्वतः ला अजून एक संधी द्या. त्या संधीचे सोने करा