साखरपुडा ते लग्न किती महिन्याचे अंतर असायला हवे ? लग्न जुळवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते. जर एखादे स्थळ जुळले आणि पुढची बोलणी होऊन साखरपुड्या पर्यंत गेले कि अर्धे टेन्शन संपते असे म्हणायला हरकत नाही. कारण साखरपुडा म्हणजेच एक निश्चिती असते कि आता हे लग्न होईल. पण काहीवेळा ते लग्नापर्यंत पोहचू शकत नाही. पण बऱ्याचदा लग्नापर्यंत गोष्ट पोहचतेच. आता विषय हा कि या साखरपुड्या पासून ते लग्नापर्यंत किती अवधी किंवा कालावधी असावा?
साखरपुडा ते लग्न किती महिन्याचे अंतर असावे?
- माझ्या मते जितक्या लवकर हा साखरपुडा आणि लग्न उरकले जाईल ते फार छान.
- जसे कि काही ठिकाणी साखरपुडा आणि लग्न एकाच दिवशी उरकला जातो. हे एकदम योग्य आहे असे मला वाटते. कारण मग पुढचे टेन्शन नाही आणि एका खर्चात दोन गोष्टी होतात. म्हणजे वेगळा असा खर्च करायची गरज नसते. लग्नाच्या खर्चातच साखरपुडा होतो. किती सोपं होऊन जाते.
- काही ठिकाणी एक महिन्यानंतर लग्न होते.
- काही ठिकाणी तीन महिन्यानंतर लग्न होते.
- काही जण सहा महिन्यानंतर लग्न ठरवतात.
- काहींच्या बाबतीत तर एका वर्षाने लग्न होते.
- एका वर्षाने लग्न यासाठी कारण मुलगी शिक्षण घेत असेल तर शैक्षणिक वर्ष पूर्ण झाल्यावर लग्न केले जाते तोपर्यंत फक्त साखरपुडा उरकतात.
साखरपुडा आणि लग्न यामधील अंतर जास्त नसावे कारण
- साखरपुडा ते लग्न या दरम्यानचा प्रवास हा खूप अविस्मरणीय असा असतो.
- मुलगा मुलगी बऱ्याच वेळा भेटतात.
- एकमेकांना समजून घेतात.
- अजून एकमेकांना ओळखू लागतात.
- एक मैत्रीचे नाते निर्माण व्हायला सुरवात होते.
- म्हणून हे भावनिक बंध जेव्हा प्रबळ होत असतात. त्याच दरम्यान जर त्यांचे लग्न करण्यात आले तर फारच छान होईल.
साखरपुडा ते लग्न यामधील अंतर जास्त असल्यास
- हे अंतर जर जास्त असेल तर काही वेळा साखरपुडा तुटू शकतो.
- अचानक काही अडचणी उद्भवू शकतात त्यामुळे लग्न होत नाही.
- काहीवेळा भलतीच चूक मुलगा आणि मुलगी यांच्या हातून घडू शकते. कारण या दरम्यान ते बऱ्याचवेळा एकमेकांशी भेटणार आणि जर शारीरिक जवळीक झालीच तर नसता व्याप व्हयचा.
सत्य परिस्थती:
तसे पाहता आपल्याकडे याचा विचार बहुदा केला जात नाही कि साखरपुडा आणि लग्न यामध्ये नेमके किती अंतर असावे. कारण हा त्या कुटुंबाचा प्रश्न. कारण सगळं जुळून यावे लागते. एक तर लग्नाची तारीख सगळ्यांना सोयीची असायला हवी. त्यामुळे बऱ्याचदा साखरपुडा ते लग्न यात अंतर असते.
काहींना सगळं लवकर उरकायचे असते. म्हणून दोन्ही मध्ये जास्त अंतर नसते. तसेच सर्वांना सगळं काही सोयीचे आहे कि नाही हे देखील बघायचे असते. त्यानंतर मग लग्नाची किंवा साखरपुड्याची तारीख ठरवतात. तसे पाहता काही जणांचा साखरपुडा झाल्या झाल्या लग्न व्हायला हवे हाच अट्टाहास असतो काहींच्या बाबतीत मात्र हा अपवाद असतो.
तात्पर्य:
साखरपुडा आणि लग्न यामध्ये बराच वेळ बराच वेळ आणि मेहनत सुद्धा जाते. त्यामुळे दोन्ही एकाच वेळेला आटपलं तर आपलाच फायदा होणार आहे. नाहीतर साखरपुड्यासाठी वेगळी मेहनत आणि लग्नासाठी वेगळी मेहनत करावी लागेल. तसा हा निर्णय दोन्ही कुटुंबांचा असतो.
जो कि त्यांनी मिळून मिसळून घ्यायचा असतो. सगळ्या बाजू चाचपडून पाहायच्या असतात. सगळ्यांना जमेल का? तसेच विवाहाचे मुहूर्त आहेत का ते देखील बघायचे असते. तर या अशा वेगवेगळ्या गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतात. पण काही हि म्हणा,