धुळवड/ धुलीवंदन/ रंगपंचमी: सणाची संपूर्ण माहिती मराठी

संपूर्ण भारतात होळी हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. वेगवेगळ्या ठिकाणी होळीची वेगवेगळी नावे आहेत. तसेच वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि वेगवेगळे दिवस होळी साजरी केली जाते.
होळीच्या दुसऱ्या दिवशी धुली वंदन किंवा धुळवड असे देखील म्हणतात. तिलाच रंगपंचमी देखील म्हटले जाते. काही ठिकाणी रंगपंचमी ही पाच दिवसांनी, सात दिवसांनी अशी देखील साजरी करतात. जे मी आधीच म्हटले की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे दिवस होळी साजरी करण्याचे असतात. पण आपण सार्वजनिक सुट्टीच्या हिशेबाने धुळवड/ धुलीवंदन/ रंगपंचमी कशी साजरी करतात ते पाहूया?

धूलिवंदन साजरे करण्याच्या प्राचीन पद्धती:

सध्याचे धूलिवंदन:

पण हल्लीचे धुलीवंदनाचे स्वरूप पाहता रेन डान्स आयोजित केला जातो. काही ठिकाणी वेगवेगळे मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. जिथे नाच व काही गेम्स वगैरे ठेवले जातात. सोसायटीमधील लहान मुले स्वतःला वेगवेगळ्या रंगांमध्ये रंगवून घेतात. अक्षरशा ओळखता देखील येत नाहीत.

सकाळपासून दुपारपर्यंत रंगपंचमीचा आस्वाद घेतला जातो. रंगीत फुगे, रंगीत पिचकारी, इतर रंगीत पाणी यांच्या वापर या धुलिवंदनात हमखास होतो. सफेद रंगाचे कपडे घालून ते अजून रंगीत करून टाकायचे ही एक नवीन संकल्पना या धुलीवंदनात दिसून येते. वेगवेगळे खायचे पदार्थ देखील ठेवलेले असतात. तर असे हे आजच्या पिढीचे धुलीवंदन किंवा रंगपंचमी.

धुलीवंदनात काय काळजी घ्याल?

धुलीवंदन साजरी करताना नैसर्गिक रंगांचा वापर करावा. 
शक्यतो धुलीवंदन कोरड्या रंगानेच करावे. त्यातही गुलाल सर्वात चांगले आहे
 उगीचच जबरदस्तीने कोणालाही रंग लावू नये. एखाद्या व्यक्तीला जर रंग नाही आवडत असेल तर त्याचा तो मान राखावा आणि त्या व्यक्तीला त्रास देऊन जबरदस्तीने रंग लावू नये.
फुगे जमिनी वरती फोडावेत. डोळ्यावर वगैरे फोडू नयेत. अन्यथा इजा होण्याची शक्यता असते. फुग्यांमध्ये रंगीत पाणी भरावे. इतर कोणत्याही वस्तू भरून नयेत. जसे की चिखल. 
त्याचप्रमाणे शक्यतो पाण्याची नासाडी टाळावी. जमले तर पाण्याचा वापर कमीत कमी प्रमाणात करावा. कारण आपल्याकडे तर पाणी आहे. पण अशी कित्येक ठिकाणे आहेत. जिथे पाण्याचा दुष्काळ आहे. ज्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. अशांचा विचार करून सुकी होळी किंवा कोरडी होळी खेळावी. त्याने पाण्याची नासाडी होणार नाही. शांतपणे आणि काळजीपूर्वक असे धुलीवंदन साजरे करण्याचा प्रयत्न करावा.
दरवेळी नाच गाणी झालीच पाहिजे असा आग्रह न धरता वेगळे काही करून पाहावे. ज्यामध्ये सामाजिक दृष्टिकोन दडलेला असेल. त्यांने आपण सर्वां पुढे एक आदर्श ठेवू शकतो. एक उदाहरण निर्माण करू शकतो.
धुलिवंदनाचा आनंद देखील द्विगुणीत करू शकतो. जसे की या दिवशी तुम्ही गरजूंना खायला देऊ शकता. त्याला पाणी उपलब्ध करून देऊ शकता. रंगांवरती खर्च करण्याऐवजी एखाद्या शाळेत जाणाऱ्या मुलाला रंगीत खडू किंवा स्केच पेन वगैरे देऊ शकता. 
हे असे केले तर तुम्हाला मानसिक समाधान लाभेलच. पण हे इतर धुलीवंदन/ रंगपंचमी पेक्षा उत्तम असे धूलिवंदन असेल जे कायम लक्षात राहील.

Exit mobile version