अक्षय तृतीया: जाणून घ्या महत्व, दान धर्म, कामे पूजा सम्पूर्ण माहिती

      साडेतीन मुहूर्तांमधील एक मुहूर्त म्हणजेच अक्षय तृतीया. अक्षय तृतीया या शब्दाचा शब्दशः अर्थ घ्यायचा झालाच तर तो म्हणजे अक्षय आणि तृतीया. अक्षय म्हणजेच कधीही क्षय किंवा कधीही न संपणे. तसेच तृतीया म्हणजेच तीन. पण ही तृतीया तर प्रत्येक महिन्यात असतेच.

मग अक्षय तृतीयाच का? चला या प्रश्नाचे उत्तर पाहूया

वैशाख शुद्ध तृतीया (अक्षय तृतीया) का आहे महत्वाची?

     वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया असे म्हणतात. कारण वैशाख महिन्यात येणाऱ्या तृतीयेला महत्त्व आहे. इतर महिन्यात येणाऱ्या तृतीयेला नाही आणि जसे आधी म्हटले की हा एक साडेतीन मुहूर्तांमधील मुहूर्त देखील मानला गेला आहे.

या दिवसाचे महत्व अनन्य साधारण असे आहे. कारण या दिवशी आपण जी काही गोष्ट करू ती कधीही संपणार नाही. तिचा कधीही क्षय होणार नाही. ती कधीही कमी पडणार नाही आणि म्हणूनच या दिवशी जर आपण अक्षय तृतीयेचे व्रत केले तर ते आपल्यासाठी फार लाभदायी ठरू शकते.

अक्षय तृतीयेच्या व्रताची आणि पूजेची थोडक्यात माहिती

वैशाख महिना, शुक्ल पक्ष आणि तृतीया यांचा अद्भुत मेळ म्हणजेच अक्षय तृतीया होय. या दिवशी लक्ष्मी नारायणाचे पूजन करतात. तसेच हा दिवस परशुराम जयंती म्हणून देखील साजरी करतात.

तर अशा पद्धतीने आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा करू शकतो. या दिवशी उपवास केलेला फार चांगला. सकाळी लवकर उठून स्नान करून मगच पूजा केली जाते.

अक्षय तृतीये ला काय दान करावे?

   असे म्हणतात त्या दिवशी दान करावे. गरजूंना पाण्याने भरलेला माठ दान करावा. उन्हाची झळ लागू नये म्हणून छत्री दान करावी किंवा पायातल्या चपला दान कराव्यात. या दिवशी दानाचे खूप महत्त्व आहे.

अक्षय तृतीये ला काय कामे करावित?

एवढेच नाही तर आपण या दिवशी सोन्याची खरेदी करावी. नवीन कपडे घ्यावेत, ते परिधान करावेत. याच दिवशी वाहन खरेदी म्हणा किंवा नवीन घर घेणे किंवा गृह प्रवेश करणे देखील शुभादायक मानले जाते. हा एक स्वयं सिद्ध असा मुहूर्त आहे. कारण हा पूर्ण दिवस शुभ मानला जातो. या दिवशी आपण कोणतेही काम सुरू करू शकतो. जसे की नवीन मंडळांची स्थापना करणे किंवा नवीन कार्य सुरू करणे देखील फार चांगले मानले गेले आहे.

या दिवसाचे अजून एक महत्त्व म्हणजे या अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण जप किंवा नामस्मरण केले तर त्याचे पुण्य खूप मिळते. ते कधी ही कमी पडत नाही. क्षय होत नाही. तर अधिक वाढते आणि म्हणूनच या दिवशी शुभ बोलावे. कारण वाईट वृत्ती किंवा विचार देखील या दिवशी केला किंवा भांडणे, क्लेश केला तर तो ही कधी कमी पडणार नाही. म्हणून या शुभ दिवशी आपण आनंद दायी असावे. म्हणजेच आनंदाचा आपल्या आयुष्यात कधी ही क्षय होणार नाही.
Exit mobile version