पौर्णिमा: माहिती जाणून घ्या सर्वकाही

पौर्णिमा

       पौर्णिमा म्हणजे पूर्ण चंद्र. या दिवशी चंद्र त्याच्या पूर्ण आकारात असतो. अमावस्या झाल्यानंतर चंद्र कलेकलेने वाढत जातो आणि शेवटी पूर्ण चंद्र होतो. इथे आपण पौर्णिमा विषयी माहिती घेऊ.

पौर्णिमेचे धार्मिक महत्व

      एका वर्षात १२ पौर्णिमा असतात. प्रत्येक महिन्यात एक पौर्णिमा अशा एकूण बारा. या पौर्णिमेला एखादा सण नक्की असतो. पौर्णिमेच्या दिवशी आकाशात चंद्राचा प्रकाश सर्वत्र पसरलेला आढळतो. या दिवशी काही खास पूजा देखील आयोजित केल्या जातात जसे जी सत्य नारायणाची पूजा.

पौर्णिमेचे वैज्ञानिक महत्व

पूर्णिमा या दिवशी बुद्धांप्रमाने अनेक देवांनी जन्म घेतलेला. वैज्ञानिक दृष्ट्या पाहता पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची शक्ती खूप जास्त असते. त्यामुळे आपली शारीरिक क्षमता आणि मानसिक क्षमता देखील खूप चांगली असते. शरीराचे आणि मनाचे एक वेगळीच संतुलन आपल्यास पाहायला मिळते.

काही ठिकाणी पौर्णिमेच्या दिवशी उपवास देखील करतात. काही जण या दिवशीचा उपवास, एक वेळेस जेवण करतात, जसे की दिवसभर काहीही न खाता, रात्री उपवास चंद्राचे दर्शन घेतल्यानंतर सोडला जातो. या दिवशी उपवास ठेवणे हे देखील खूप चांगले असते. वैज्ञानिक दृष्टीने देखील उपवासाचे बरेच महत्त्व आहे. पौर्णिमेच्या दिवशी जर उपवास ठेवले तर शरीरावर आणि मनावरती सकारात्मक परिणाम होतात.

        पण तसेच याउलट देखील होऊ शकते. जर दिवसभर तुम्ही आळशी, उदास, खिन्न असाल तर पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण दिवस तुम्हाला तसेच वाटेल. नकारात्मक विचार असतील तर तेच तुमच्यावर जास्त हावी होतील.

हिंदू कॅलेंडर प्रमाणे येणाऱ्या वेग वेगळ्या पौर्णिमा पुढीलप्रमाणे:

      पौर्णिमा ही देखील एक अशी शक्तिशाली वेळ असते ज्या दिवशी आपण स्वतः ला पूर्णपणे समर्पित करतो. मग ते नाते असो किंवा एखादे काम असो. महिन्यातून एकदा पौर्णिमा येते. दरवर्षी एकूण १२ पौर्णिमा असतात. इंग्लिश मध्ये full moon असे पौर्णिमेला म्हणतात. पौर्णिमा देखील एक खगोलीय घटना आहे. एक चंद्र तिथी आहे. तर अशीही पौर्णिमा.

पौर्णिमेच्या दिवशी केले जाणारे उपाय

या पौर्णिमेच्या दिवशी देखील अनेक उपाय केले जातात. अनेक मंत्र सिद्धी देखील केल्या जातात. तसा हा दिवस फार चांगला मानला जातो. अमावस्येला जसा काळा दिवस म्हणतो. तसा हा दिवस नसतो. या दिवशी चांगले कार्य केले जाते. त्यासाठी देखील हा दिवस ग्राह्य धरतात. कारण बऱ्याचदा पौर्णिमेच्या दिवशी अनेक सण देखील येतात आणि म्हणूनच हा एक पवित्र आणि चांगला दिवस म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच या दिवशी अनेक उपाय केले जातात.

लक्ष्मी प्राप्तीसाठी, सुख शांतीसाठी, आपापल्या सोयीने लोक उपाय करतात. बारा प्रकारच्या बारा पौर्णिमा संपूर्ण वर्षांमध्ये असतात. काही ठिकाणी काही पौर्णिमेचे देखील उपास असतात. त्याचे देखील व्रत असते. कारण एखादी इच्छा आपली पूर्ण व्हावी, इच्छित फळ मिळावे यासाठीच हे उपवास केलेले असतात. म्हणूनच या दिवसाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात येणारी पौर्णिमा आपल्या या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली आहे.

       चंद्र हा आपल्या मनाचा कारक आहे. हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे या चंद्राचा थोड्याफार प्रमाणात का होईना पण आपल्यावरती प्रभाव हा पडतोच. पौर्णिमेच्या वेळेचा चंद्र जो पूर्ण चंद्र असतो पृथ्वीवरून तो पूर्णपणे गोलाकार असा चंद्र आपल्याला पहावयास मिळतो. त्याचा उजेड सर्वत्र पसरलेला असतो. रात्रीच्या या अंधारात, त्या चंद्राच्या तेजाने ते संपूर्ण आकाश प्रकाशित होते……असा तो पूर्ण चंद्र पाहताना आपण देखील धन्य होतो. प्रत्येक पौर्णिमेच्या वेळी अशीच भावना आपल्या मनी असते. पूर्ण चंद्र पाहून खूप छान वाटते, मनाला शांती भेटते. तेच अमावस्येच्या दिवशी मात्र आपण चंद्राला शोधत असतो आणि गर्द काळोख भवताली दाटलेला असतो.

    लहान मुलांना देखील या चंद्राचे, चांदोबा मामाचे खूप अप्रूप असते. आकाशात लहान मुलं चंद्राला शोधत असतात. ढगाच्या आड लपलेला चंद्र, चंद्राची कोर व पूर्ण झालेला पौर्णिमेच्या चंद्र म्हणजे एक मनमोहक दृश्यच….

Exit mobile version