लग्नाला होकार देण्याआधी या गोष्टी नक्की तपासून पहा

लग्नाला होकार देण्याआधी गोष्टी तपासणे का महत्वाचे आहे?

      लग्न ठरवणे एक खूप मोठं जिकिरीचे काम आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण मुलगा व मुलगी या दोघांच्याही आयुष्याचा प्रश्न असतो. थोडीशी जरी चूक झाली तर आयुष्यभर पश्चातापाची वेळ येते. म्हणून तर लग्नाला होकार देण्याआधी काही गोष्टी तपासून पाहिल्या जातात. या लेखामध्ये पाहूया लग्नाला होकार देण्याआधी कोणत्या गोष्टी तपासून पाहायच्या?

लग्नाला होकार देण्याआधी या गोष्टी नक्की तपासून पहा

      तरी या आणि अशा अनेक गोष्टी आहेत. ज्या लग्नाला होकार देण्याआधी तपासून पाहिलेल्या बऱ्या.

जसे की मुलाला व्यसन आहे किंवा नाही? मुलीला स्वयंपाक येतो किंवा नाही? मुलगा घरात जबाबदारीने वागतो किंवा नाही? दाखवण्यापुरते सगळच काही अलबेला असू शकतं. पण सत्य परिस्थिती कदाचित वेगळी असू शकते. त्यामुळे दिखाव्याला बळी न पडता योग्य तो निर्णय घेणे हेच सोयीस्कर ठरते. अशावेळी वडीलधाऱ्या माणसांची मदत घेणे. त्यांच्याशी सल्ला मसलत घेणे हे योग्य ठरते.

सत्य परिस्थिती मध्ये काय केले पाहिजे

      हल्लीच्या या डिजिटल युगात मुलं मुलीच स्वतःला पसंत करतात. त्यांना त्यांचे आचार विचार जुळताहेत असे वाटते आणि त्यामुळे ते लग्न करण्याचा निर्णय घेतात. घरातली मोठी मंडळी देखील हल्ली आपल्या मुलांना पाठिंबा देतात. पण कुठेतरी काहीतरी बिनसते आणि काही महिन्यात किंवा काही वर्षात हे लग्न संपुष्टात येते. अशी परिस्थिती सध्याची झाली आहे.

याआधी तावून-सुलाखून पारखून एखादे स्थळ निवडले जायचे. मगच लग्न व्हायचे. अशी लग्न वर्षानुवर्षे टिकायचे. आता लग्न टिकवणे किंवा न टिकवणे हे त्या जोडप्याच्याच हातात आहे. कारण शेवटी संसार त्या दोघांना करायचा आहे. त्यामुळे इथे पुन्हा एकदा हाच प्रश्न उद्भवतो की लग्न करण्याआधी किंवा लग्नाला होकार देण्याआधी खरंच सर्व गोष्टी तपासून पाहिलेल्या किंवा नाही? की डोळ्यावर आंधळी पट्टी बांधून एखाद्या निर्णय घेतला गेला.

मग हे असे काही होते. जर तसे होऊ नये असे वाटत असेल तर व्यवस्थित चौकशी करून मगच लग्नासाठी तयारी दाखवावी. बऱ्याचदा या उलट देखील होते. कितीही चौकशी केली तरी काही वेळेला ते देखील लग्न संपुष्टात येते. तेव्हा अशा वेळेला नेमका दोष कोणाचा? जसे मी आत्ताच म्हटले की हा संसार त्या जोडप्याचा आहे. त्यांना एकमेकांसोबत राहायचे किंवा नाही हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असेल?

तात्पर्य:

     शेवटी आपण फक्त सर्व बाजू व्यवस्थित तपासून सगळी चौकशी करून मगच एखादे स्थळ ठरू शकतो किंवा त्या स्थळाला होकार देऊ शकतो. बाकी पुढे चांगलेच होईल अशी आशा ठेवू शकतो.

Exit mobile version