लग्नासाठी जोडीदार पाहताना आपण बऱ्याच निकषांचा वापर करतो. वेगवेगळ्या अटी तटी लक्षात घेतल्या जातात. तसेच जोडीदार अमुकच हवा. जोडीदारा मध्ये हेच गुण हवे. सतत त्या अपेक्षांची भूनभून डोक्यात चालतच असते.
मुलांना मुलींमध्ये बऱ्याच गोष्टी हव्या हव्या अशा वाटतात. आपली होणारी बायको आपल्या आईप्रमाणे कुशल सुद्धा हवी आणि आपली प्रेयसी पण तिने बनावे असे देखील विचार मुलांचे असतात. म्हणूनच लग्नासाठी मुलीमध्ये कोण कोणते गुण असायला हवे ते आपण या लेखामध्ये पाहूया.
लग्नासाठी मुलीमध्ये कोणते गुण पहिले जातात
- सगळ्यात पहिला विचार येतो तो म्हणजे मुलगी नाकी डोळी नीटस असावी. म्हणजेच दिसण्यास योग्य अशी असावी. पण यात देखील यांचे निकष आहेत गोरीच बायको हवी. काहींसाठी रंगरुप महत्वाचे असते. मित्रानो, रंगरूपापेक्षा माणसाचे मन, त्याचा स्वभाव हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते हे देखील मुलांनी लक्षात घेतले पाहिजे. याचा देखील विचार केला पाहिजे.
- त्यानंतर तिचा स्वभाव मनमिळाऊ आहे ती नाही ते आपण पाहू शकतो.
- म्हणजे थोरामोठ्यांचा आदर करणारी, विनम्र हवी.
- सतत कार्यशील असवी.आळशीपणा नसावा.
- पुढाकार घेऊन काम करणारी,
- कामात पटपट, तसेच चूण चुणित असावी.
- शिकली सवरलेली आणि चांगल्या पगाराची नोकरी करणारी असावी.
- अजून म्हणायचे झाले तर स्वतःच्या आई-वडिलांचा सांभाळ करणारी
- घर सांभाळणारी असावी.
- लहान मुले वगैरे आवडतात की नाही याचा देखील अंदाज बरेच जण घेतात.
- व्यवहार कौशल्य दाखवावे लागते मुलीला. म्हणजे जर किराणामाल आणणे किंवा बाजारहाट करून त्यामध्ये ती किती पैसे वाचवते? किती बचत करते? तिचा खर्च कसा नियोजित करते? घरचं बजेट कसं सांभाळते? ही देखील बाब महत्त्वाची असते.
- मदतीस किती धावून जाते.
- घरातल्यांची किती काळजी घेते.
- स्वयंपाक बनवता येतो की नाही हे पण तेव्हढेच महत्वाचे असते.
- मुळू मुळू रडत बसणारी नको, तर सहनशील पण हवी आणि वाघीण हि हवी
तर या आणि अशा बऱ्याच गुणांचा खजिना मुलींमध्ये असला पाहिजे
मुलगी पाहण्याची पूर्वीची पद्धत
तुम्ही ऐकून असाल कि आधी मुलीला चालून दाखवायला सांगायचे किंवा गायला सांगायचे या गोष्टीचा खरा अर्थ म्हणजे तिला चालते येते का हे तपासायचे होते आणि गाणे गाऊन दाखवायला यासाठी सांगायचे ते म्हणजे तिला बोलता येते कि नाही हे तपासायचे असते.
तर काही वर्षांपूर्वी हि अशा प्रकारची परीक्षा मुलींची घेतली जायची एवढेच नव्हे तर काही वेगळेच प्रश्न देखील विचारले जायचे जसे कि विहिरीला पायऱ्या किती आहेत? चुलीत लाकडे किती आहेत ? वगैरे वगैरे मग मुलींनी पटकन उत्तर दिले कि तिचा हजरजबाबाबीपणा दिसून येतो.
मला आठवते माझ्या सासूबाईंनी पण एक प्रश्न मला सांगितलेले गावात बऱ्याच ठिकाणी मुलीला भाकरी किंवा पापड भाजून दाखवायला लागायचा. यावरून लक्षात यायचे कि मुलगी स्वयंपाकात किती हुशार आहे?
सत्य परिस्थिती:
तसे पाहता हल्लीच्या मुली गुणसंपन्न आहेत यात वादच नाही आणि आजकाल मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि ते चुकीचे नाही आहे.
कारण आज काळ मुली सुद्धा मुलांच्या तोडीस तोड आहेत हे काही वेगळे सांगायला नको. वरील गुंणांपैकी सगळेच गुण असतील असे नाही. काही कमी जास्त होऊ शकते आणि एवढेच नव्हे तर लग्नानंतर बऱ्याच नवीन गुणांमध्ये भर पडते असा माझा अनुभव आहे.
लग्नासाठी मुलीमध्ये इतके गन पाहण्याची खरंच गरज आहे का
त्यात तिच्या पत्रिकेचे गुण मिलन हि केले जाते. हे देखील तिची परीक्षा घेणेच झाले आणि बाकी देखील मुलीने एक्दम व्यवस्थित,नीट नेटके असावे, तिला कितीही त्रास होवो. चेहऱ्यावर कायम हसू असावे आणि इतर बऱ्याच गोष्टी मुलांना वाटत त्यांच्या होणाऱ्या जोडीदारात हव्यात. जे काही असेल ते जास्त पण अडून राहू नये.