आपलेही लग्न व्हावे, मनासारखा जोडीदार मिळावा हे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि त्याची गुलाबी स्वप्ने प्रत्येक जण पाहत असतो. बऱ्याच आशा अपेक्षा असतात प्रत्येकाला आपल्या जोडीदराकडून.
फसवणूक झाल्याचे परिणाम
जर लग्न जुळवताना मुलाची मुलीच्या परिवाराकडून फसवणूक झाली तर? ही शक्यता नाकारता येत नाही. जर असं काही झालंच तर काही खरे नाही त्या मुलाचे.
त्या मुलाचे सर्व आयुष्य उध्वस्त होते. त्याच्या मनाचे खच्चीकरण होते आणि तो खूप मोठ्या नैराश्यात जातो. जर असे झाले तर यातून बाहेर पडणे त्यासाठी खूप कठीण जाते. एक प्रकारच्या नरक यातना भोगल्या सारख्या वाटतात. तर हे होते काही विपरीत परिणाम जर मुलाची फसवणूक झाली असल्यास.त्या आधी पाहू मुली कडचे कशा पद्धतीने फसवणूक करू शकतात:
लग्न जुळवताना मुलाची मुलीच्या परिवाराकडून कशा प्रकारे फसवणूक होऊ शकते?
- मुलीने आधी पळून जाऊन लग्न केले असेल आणि तिच्या आई वडिलांनी तिला परत घरी आणले असेल आणि ते स्वतः तिचे लग्न लवकर लाऊन देत असतील. त्यासाठी ते खूप घाई करत असतील.
- मुलीला स्वयंपाक येतो किंवा तिचे शिक्षण याबाबतीत मुलीकडचे खोटं सांगू शकतील.
- मुलीला एखादा गंभीर आजार असेल आणि तो जर मुलिकडच्यानी लपवला असू शकतो. त्याबाबतीत ते काहीच सांगत नाहीत.
- मुलीचे बाहेर एखादे प्रेम प्रकरण असू शकते. याचा अंदाज मुलीच्या घरतल्याना सुद्धा नसतो.
- काहीवेळा मुली कडच्यांकडून खूपच बडा जाव किंवा श्रीमंती दाखवली जाते. त्यामुळे मुला कडच्यानी हुरळून न जाता कान, डोळे उघडे ठेवावेत आणि याबाबतची चौकशी करावी. जर हे सगळं खोटं निघालं तर तुम्हाला कधी ते फसवून फरार होतील हे कळणार सुद्धा नाही.
- मुलीचे वय कमी सांगणे.
- मुलीच्या पत्रिके मध्ये फेरबदल करणे म्हणजे तिची पत्रिका उत्तम असेल.
तर ह्या होत्या काही फसवणूक जे मुली कडचे करू शकतात.
मुलाकडच्यानी खासकरून मुलाने खालील प्रकारे काळजी घेतली तर त्याची फसवणूक होणार नाही.
फसवणूक होऊ नये म्हणून मुलाने कोणती काळजी घेतली पाहिजे
- मुलीला भेटायला जाण्याआधी तिच्या बाबतीत सोशल मीडियावर माहिती पहावी. जर ती नसेलच तर तिचे सोशल मीडियावर फार माहिती दिसणार नाही किंवा तिचे account सुध्दा नसेल. काही मुली यात अपवाद असू शकतात की ज्यांचे सोशल मीडियावर काहीच नसते. हल्ली असे फार कमी पहायला मिळते. सगळ्याच मुली सोशल मीडियावर फार ॲक्टीव असतात आणि त्यांच्या आई वडिलांना पण हे माहीत नसते. त्यामुळे हा एक मार्ग थोडी फार माहिती काढण्यासाठी.
- स्वतः जर मुलीसोबत बोलणार असाल तर तिला स्पष्ट विचारा तिचे लग्न जबरदस्तीने होत नाही ना? किंवा बाहेर कुठे तिचे प्रेम प्रकरण आहे का? लगेच सांगणार नाही ती. पण प्रयत्न करा, तिला आश्वासन द्या तसं काही असेल तर तुम्ही तिला मदत कराल म्हणून. अशा बोलण्यामुळे जर ती सर्व सांगायला तयार झाली तर चांगलेच आहे की.
- आजूबाजूला चौकशी करा. मुली कडचे किती वर्ष तिथे राहत आहेत. त्यांना कोणी ओळखतात की नाही. मग तुम्हाला एकंदरीत अंदाज येईल मुली कडचे कसे आहेत खोटे की खरे?
- मुलीचे नातेवाईक, मैत्रिणी किंवा मध्यस्थ यांशी पण संवाद साधू शकता.
- जर सगळंच जमलं असेल तर वैद्यकीय चाचण्या करून ती सुदृढ आहे की नाही याची पण खात्री करून घेऊ शकता.
तर अशा प्रकारे मुलाने काळजी घ्यावी.
तात्पर्य:
सर्व काही नीट तपासून, पडताळून मगच पुढे जावे. शेवटी तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. बऱ्याचदा खूप काळजी घेऊन सुद्धा फसवणूक होते. मुलीचे बाहेर प्रेम प्रकरण असते. इथे लग्न करते आणि दुसऱ्या दिवशी स्वतः दुसऱ्या मुलाबरोबर पळून जाते.
तर इथे सर्व मुलींना माझी नम्र विनंती की कोणालाही फसवू नका. तुमच्या आई वडिलांना विश्वासात घ्या. ते तुमचं नक्की ऐकतील. उगाचच एखाद्या निष्पाप मुलाचा नाहक बळी जाऊ देऊ नका. त्यांच्या आयुष्याशी खेळू नका, माती करू नका.