नवरी मिळे नवऱ्याला
  • बातम्या
  • धार्मिक
    • पौराणिक
    • सण
    • पौराणिक कथा
    • गणपती बाप्पा
    • पूजा अर्चा
    • उपाय
    • अमावस्या
    • पौर्णिमा
  • विवाहपूर्व सल्ला
  • विवाहसोहळा
Saturday, November 22, 2025
  • Login
  • Home
  • धार्मिक
  • लगीनघाई
    • लग्नाविषयी बोलू काही
    • घरजावयांचे प्रश्न
    • नात्यांविषयी बोलू काही
  • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
  • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
  • विवाहपूर्व सल्ला
No Result
View All Result
  • Home
  • धार्मिक
  • लगीनघाई
    • लग्नाविषयी बोलू काही
    • घरजावयांचे प्रश्न
    • नात्यांविषयी बोलू काही
  • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
  • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
  • विवाहपूर्व सल्ला
No Result
View All Result
नवरी मिळे नवऱ्याला
No Result
View All Result
Home कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन

आजकालच्या आई-वडिलांनी मुलाचं लग्न झाल्यावर कसं वागायला हवं?

in कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन, नात्यांविषयी बोलू काही, लग्न समस्या आणि त्यांचे उपाय, लग्नाविषयी बोलू काही, विवाहपूर्व सल्ला, विवाहसोहळा
0
आजकालच्या आई-वडिलांनी मुलाचं लग्न झाल्यावर कसं वागायला हवं?
6
SHARES
32
VIEWS

         प्रत्येक पालकांची एकच इच्छा असते. आपल्या मुलांचं भलं व्हावं. त्यांना योग्य तो जोडीदार मिळावा. योग्य वयात त्यांचे लग्न व्हावे आणि पुढे त्यांचा संसार फुलावा. यासाठी त्यांचे अतोनात प्रयत्न सुरू असतात.अगदी स्थळ शोधण्यापासून ते लग्न लागेपर्यंत सगळी जबाबदारी पालक आपलं आद्य कर्तव्य म्हणून पार पाडतात.मुलांच्या सुखी संसाराला वाढताना पाहतात. पण बऱ्याच अंशी असे दिसून येते की लग्न झाल्यानंतर नुसती भांडण, क्लेश इत्यादींचा सामना त्यांना करावा लागतो. काही ठिकाणी हे नसेलही. पण मग मुलाचे लग्न झालेल्या आजकालच्या आई-वडिलांनी नेमकं कसं वागावं हे देखील पाहणे तितकंच महत्त्वाचं ठरतं. चला तर पाहूया या लेखामध्ये.

आजकालच्या आई-वडिलांनी मुलाचं लग्न झाल्यावर कसं वागायला हवं?

  • सर्वप्रथम लग्न झाल्यानंतर सतत मुलाच्या संसारात ढवळाढवळ करू नये. होता होईपर्यंत आपण लांबच राहावं. मी हे नाही म्हणत की जर तुम्ही एकत्र कुटुंब म्हणून राहत असाल तर तुम्ही वेगवेगळ राहावं. तुमची लुडबुड मुलाच्या संसारात नसावी.
  • मुलाने घेतलेल्या निर्णयांमध्ये आपण स्वतःहून स्वतःचे मत मांडू नये. जर तुम्हाला तो निर्णय पटला नसेल तर मुलाला तुम्ही नंतर तसे सांगू शकता.  तुमचा मुलगा स्वतःहून तुमच्याकडे एखादा निर्णय घेण्यासाठी सल्ला मागायला आला तर तुम्ही दोघं मिळून त्यावरती चर्चा करून त्याला योग्य तो निर्णय घेण्यासाठी मदत करू शकता.
  • तसेच आई-वडिलांमध्ये आणि मुलांमध्ये आर्थिक व्यवहार करताना देखील थोडीशी खबरदारी असावी. जरी तो आपला मुलगा असला तरी तो आता स्वतःच्या पायावर उभा आहे. त्याला त्याचा संसार आहे. या सर्व गोष्टी पाहता खर्चाची बाजू किंवा अजून काही आर्थिक अडचणी याबतीत पारदर्शी असलेले बरे.
  • सर्व गोष्टींवर ती स्पष्टपणे त्याच्याशी बोलणे महत्त्वाचे ठरेल. अन्यथा मुलगा तुम्हाला गृहीत धरेल की जे आई-बाबांचे आहे ते माझेच आहे. ते आहे देखील. पण ते त्याला सांगावे की आता तू तुझा स्वतःचा संसार कर. आम्ही आहोत तुला गरज पडली तर.
  • दुसरी गोष्ट म्हणजे आई-वडिलांनी मुलाला मार्गदर्शन करावे. पण त्यांचा अट्टाहास नसावा की मुलाने हेच करावे, तेच करावे किंवा मुलाने असेच वागावे वगैरे वगैरे. कारण हे लक्षात असूद्या की मुलाला मार्गदर्शन महत्त्वाचे आहे किंवा तुमचा सल्ला महत्त्वाचा आहे. तो ते कितपत घेतो यावरती जास्त लक्ष न देणे. नाहीतर तुम्हाला वाईट वाटेल की त्याने माझे ऐकले नाही म्हणून.
  • तुम्ही फारशी अपेक्षा ठेवू नये की लग्नानंतर मुलं आपलं ऐकतीलच.
  • अजून एक महत्त्वाचे म्हणजे उगीच मुलाचे कान भरू नयेत. नवरा बायको मध्ये भांडण लावून देऊ नयेत.
  • अवास्तव अपेक्षा आपल्या मुलांकडून किंवा आपल्या सुनेकडून ठेवू नयेत. कारण अपेक्षा भंग होण्याचे दुःख सर्वात जास्त असते.
  • लग्न झाल्यानंतर मुलाला सांगावे की बाबा आता तुझा संसार आहे हा तुलाच बघायचा आहे. सगळं घर, खर्च, जबाबदाऱ्या वगैरे.
  • आधीच सर्व गोष्टीची त्याला जाणीव करून दिली तर तो त्या दृष्टीने त्याची तयारी करेल व तशी त्याची मानसिक तयारी देखील असेल आणि पुढील मनःस्ताप टाळता येऊ शकतो.
  • थोडेफार एक पाऊल मागेच राहा.
  • जर त्याला तुमच्या मदतीची गरज वाटली तर तो नक्कीच तुम्हाला सांगेल. तेव्हा मग तुम्ही तुमच्या मुलासाठी तयार राहा.

तर ह्या अशा काही पद्धतीने लग्न झाल्यानंतर मुलाच्या आई-वडिलांनी वागावे.

RelatedPosts

गरीब मुलाने अनाथ मुलीशी लग्न करावे का?

दुसरे लग्न | पुनर्विवाह करताना काय काळजी घ्याल

लग्न जुळवताना मुलाची कशा प्रकारे फसवणूक होऊ शकते? कोणती काळजी घ्याल

सत्य परिस्थिती:

             आताच्या काळात लग्न झाल्यानंतरही मुलाला व त्याच्या बायकोला आई वडील सांभाळत असतात किंवा पोसत असे म्हणा. पालकांना वाटते की लग्न लावून दिले म्हणजे तो जबाबदारी पाडेल. पण जोपर्यंत पालक ही जबाबदारी स्वतःहून मुलाच्या खांद्यावरती टाकत नाहीत तोपर्यंत तो जबाबदार कसा बनणार? आता तो काही लहान नाही. त्यात जरा काही अडचणी आल्या, जरा काही मुलाला त्रास झाला, तर पालक अगदी देवदुता सारखे मदतीस धावून जातात.

मुलांना देखील थोडेफार चटके सहन करू द्या, संसार कसा करायचा हे शिकू द्या, अनुभव घेऊ द्या. तुम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहा. पण सतत पुढे पुढे करू नका. अशाने त्यांना आयती सवय लागेल आणि ते स्वतःची जबाबदारी विसरतील.

        शेवटी एवढेच सांगेन की लग्न झालेल्या मुलाला त्याची स्वतःची जबाबदारी ओळखू द्या, घेऊ द्या आणि पार पाडू द्या. तुम्ही मात्र त्याचे आधारस्तंभ म्हणून नेहमी त्याच्या पाठीशी उभे रहा.    

Tags: एकत्र कुटुंब पद्धतिकौटुंबिक सल्ला मार्गदर्शनविवाहानंतर

Related Posts

लग्न करण्या अगोदर कोणत्या चाचण्या / तपासण्या कराव्या?
कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन

लग्न करण्या अगोदर कोणत्या चाचण्या / तपासण्या कराव्या?

January 30, 2024
विवाह होण्यासाठी, ठरण्यासाठी काही साधे उपाय
उपाय

विवाह होण्यासाठी, ठरण्यासाठी काही साधे उपाय

February 3, 2024
मंगळ असलेल्या मुलींशी लग्न करणे का टाळले जाते?
उपाय

मंगळ असलेल्या मुलींशी लग्न करणे का टाळले जाते?

January 29, 2024
लग्नाआधी हळद का लावली जाते?
धार्मिक

लग्नाआधी हळद का लावली जाते?

February 3, 2024
मुलगा व मुलीचा रक्त गट एकच असेल तर काय होईल?
लगीनघाई

मुलगा व मुलीचा रक्त गट एकच असेल तर काय होईल?

February 3, 2024
नोंदणी विवाह: कसा करतात / किती खर्च येतो
लगीनघाई

नोंदणी विवाह: कसा करतात / किती खर्च येतो

January 30, 2024
आधुनिक विवाह का अयशस्वी होतात?
कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन

आधुनिक विवाह का अयशस्वी होतात?

January 21, 2024
मुलीला स्वयंपाक येत नसेल तर लग्नानंतर मुलीने काय करावे ?
कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन

मुलीला स्वयंपाक येत नसेल तर लग्नानंतर मुलीने काय करावे ?

January 21, 2024

Recommended

अमावस्या: वाईट शक्ति? की इतर काही?

अमावस्या: वाईट शक्ति? की इतर काही?

January 30, 2024
आदर्श पत्नीचे गुण: जे द्रौपदीने सत्यभामाला सांगितले

आदर्श पत्नीचे गुण: जे द्रौपदीने सत्यभामाला सांगितले

January 30, 2024

Categories

  • अमावस्या
  • उपाय
  • एकादशी
  • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
  • गणपती बाप्पा
  • गोष्ट लग्नानंतरची
  • ज्योतिष शास्त्र
  • धार्मिक
  • नात्यांविषयी बोलू काही
  • परंपरा
  • पूजा अर्चा
  • पौराणिक
  • पौराणिक कथा
  • पौर्णिमा
  • लगीनघाई
  • लग्न
  • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
  • लग्नाविषयी बोलू काही
  • विधि
  • विवाहपूर्व सल्ला
  • विवाहसोहळा
  • सण

Don't miss it

No Content Available

नमस्कार

मंडळी आपले स्वागत आहे. आजकाल लग्न जुळविणे एक कठीण समस्या होऊन बसली आहे. इथे आपणास लग्न जुळविण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

Categories

  • अमावस्या
  • उपाय
  • एकादशी
  • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
  • गणपती बाप्पा
  • गोष्ट लग्नानंतरची
  • ज्योतिष शास्त्र
  • धार्मिक
  • नात्यांविषयी बोलू काही
  • परंपरा
  • पूजा अर्चा
  • पौराणिक
  • पौराणिक कथा
  • पौर्णिमा
  • लगीनघाई
  • लग्न
  • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
  • लग्नाविषयी बोलू काही
  • विधि
  • विवाहपूर्व सल्ला
  • विवाहसोहळा
  • सण

Recent Comments

    • About
    • Privacy Policy
    • Contact Us
    • Terms
    • Disclaimer

    © 2024 Copyright - Navri Mile Navryala

    No Result
    View All Result
    • Home
    • धार्मिक
    • लगीनघाई
      • लग्नाविषयी बोलू काही
      • घरजावयांचे प्रश्न
      • नात्यांविषयी बोलू काही
    • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
    • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
    • विवाहपूर्व सल्ला

    © 2024 Copyright - Navri Mile Navryala

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In
    This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
    Go to mobile version