आपल्या मुलाचे-मुलीचे लवकरात लवकर लग्न व्हावे. हे प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते आणि जर वेळेत लग्न झाले नाही. तर त्यांना सगळ्यात जास्त काळजी लागून राहते. कधी कधी साखरपुडा होऊन मग लग्न मोडते. तर कधी खूप प्रयत्न करून ही हवं तसं स्थळ मिळत नाही.
प्रत्येकाला वाटत असते कि आपलेही लग्न व्हावे. पण नेहमी असेच होते की ज्यांना लग्न करायचे नसतात. त्यांना ढीगभर लग्नासाठी स्थळे येतात आणि जे लग्नासाठी तयार बसलेले असतात, गुडघ्याला बाशिंग बांधून बसले असतात. त्यांना वाट पाहावी लागते.
तर अशाच सगळ्यांसाठी खालील पैकी एखादा तरी उपाय नक्की करावा. जेणेकरून लवकरात लवकर लग्न होईल. म्हणूनच हा एक छोटासा प्रयत्न यात दिलेल्या वेगवेगळ्या उपायातून लवकर लग्न होऊ शकते. विवाह होण्याचे योग निर्माण होतात. विवाह मार्गातील अडथळा दूर होईल.
विवाह लवकर होण्यासाठी, ठरण्यासाठी काही साधे उपाय:
● सोमवारचे व्रत करावे. शंकराची उपासना करावी. पाच नारळ शंकराच्या पिंडी समोर ठेवावेत व ओम श्री वरप्रदाय श्री नमः १०८ वेळा (१ माळ) जप करावा आणि ते पाच नारळ नारळ पिंडीवर अर्पण करावेत.
● प्रत्येक शनिवारी शंकराच्या पिंडीवर काळे तीळ घालावे ज्याने शनीची बाधा कमी होते आणि लग्न लवकर होण्याचे मार्ग मोकळे होतात.
● तांब्याचा एक चौकोनी तुकडा जमिनीत गाडावे. त्याने सूर्याची बाधा संपते आणि विवाह लवकर होतो.
● गुरुवारी आणि पौर्णिमेला वडाच्या झाडाला १०८ प्रदक्षिणा घालाव्यात.
● जमल्यास रोज गाईला गूळ आणि चण्याची डाळ खायला द्यावी.
● एका बाजूने शेकलेली आठ गोड चपात्या किंवा पोळ्या तपकिरी रंगाच्या कुत्र्याला खायला घालाव्यात.
● शनिवारी वाहत्या पाण्यामध्ये नारळ सोडावा जेणेकरून राहूची बाधा दूर होईल.
● गुरुवारी आंघोळ करताना पाण्यात हळद टाकून स्नान करावे.
● जेवणात केसर चा वापर करावा.
● रुक्मिणी स्वयंवर पारायण करावे.
● नुकतंच लग्न झालेल्या वधू- वर यांचे उपवर मुला/मुलींना त्यांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद द्यावा म्हणजे त्यांचे लवकर लग्न जमते.
● पिवळे वस्त्र धारण करावे.
● पिवळे फूल, चण्याची डाळ आणि चंदन यांनी विष्णूची पूजा करावी.
● शनिवारी अख्खी उडद डाळ , एक छोटा लोखंडी तुकडा, काळे तीळ आणि साबण बांधून दान करावी.
● आपल्या घरच्या कुलदेवतेला नारळ ठेवून त्यांचे स्मरण करून मागणे मागावे की घरात मंगल कार्य लवकरच पार पडू दे आणि लग्न झाल्यानंतर वधू-वरांना घेऊन आम्ही पुन्हा एकदा कुलदेवतेच्या दर्शनाला येऊ असे देखील सांगावे. मुलगा किंवा मुलगी यांच्या मातापित्यांनी हा विधी करावा.
● केळीच्या झाडाला पाणी घालावे.
● पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे.
● दर बुधवारी कृष्णाला मुला /मुलींनी हळद-कुंकू ,तुळस ,वाहून लवकर लग्न होण्याचे व मनासारखा जोडीदार मिळण्याची इच्छा मनात धरुन पूजा करावी. हा उपाय करताना मुला /मुली च्या माता-पित्याने त्यांच्यासोबत असावे.
● मुलगा किंवा मुलगी जिथे झोपतात त्या पलंगाखाली लोखंडी सामान किंवा अडगळीच्या वस्तू नसाव्यात.
● मुलांनी शिव चालीसा वाचावी , मुलींनी पार्वती मंगल वाचावे.
● ओपेल रत्न धारण करावे याने शुक्र ग्रह मजबूत होऊन विवाह योग लवकर येतो. शुक्र ग्रहाला प्रेम आणि विवाह याचा ग्रह मानला आहे.
● दक्षिण दिशेला डोके करून झोपू नये.
● काळया रंगा पासून लांब राहणे. काळ्या रंगाच्या वस्तू किंवा कपडे वापरू नयेत.
● गुरुवारी मीठ वर्ज करावे.
● वय जास्त झाले आणि लग्न जमत नसेल तर १०८ बेलपत्र वाहावे. आणि प्रत्येक गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी शिवलिंगावर हे बेलपत्र अर्पण करावी. अर्पण करताना ओम नमः शिवाय असा जप करावा.आणि असे तीन गुरुवार करावे.
● मुलगी किंवा मुलगा यांना मंगळ असेल तर हनुमानाची पूजा करावी. त्यासाठी मंगळवारी गूळ आणि पिठाचे लाडू हनुमानाला नैवेद्य म्हणून अर्पण करावे. शेंदूर व्हावा आणि बालकाण्ड चे वाचन करावे.
● सोमवारी खायच्या वस्तू दान कराव्यात याने घरात शांती येते आणि लग्नातील अडथळे दूर होतात.
● लग्न ठरत नसल्यास मुलाच्या किंवा मुलीच्या रूमचा दरवाजाचा रंग लाल अथवा गुलाबी किंवा पिवळा ठेवावा.
● लग्न होऊ इ्छिणाऱ्यांनी त्यांच्या बेडरूममधील उत्तर दिशेला क्रिस्टल बॉल काचेच्या ताटात मध्ये ठेवावा.
तात्पर्य:
हल्ली बऱ्याच कारणांमुळे विवाह उशिरा होत आहेत. शिक्षण, नोकरी, पत्रिकेतील दोष आणि अवास्तव अपेक्षा. त्यामुळे योग्य त्या वयात लग्न होणे फार कठीण होत चालले आहे. कितीही उशीर झाला. तरी खचू नये. "आपले हि लग्न होईल" हि सकारात्मकता नक्की ठेवावी.